नवी दिल्ली : करोनाबाधितांच्या संख्येत देशभरात हळूहळू वाढ होत असल्याने तिसऱ्या लाटेचे हे संकेत असल्याचे मानले जात आहेत. ऑक्टोबरपर्यंत तिसरी लाट शिखर गाठणार असल्याचा अंदाज वैज्ञानिकांनी व्यक्त केला आहे. लहान मुलांना तिसऱ्या लाटेपासून अधिक धोका असल्याचे बोललेत जात आहे.
असे असले तरी भारतातील करोना जवळपास संपण्याच्या स्थितीत आला असून, या टप्प्यावर अल्प किंवा मध्यम पातळीवर रोगाचा प्रसार सुरू राहतो, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी मंगळवारी म्हटले आहे. केंद्र सरकारच्या नीती आयोगाने दोनच दिवसांपूर्वी देशात तिसरी लाट येण्याचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर हे विधान महत्त्वाचे मानले जात आहे.
त्यांनी वृत्त माध्यमांना दिलेल्या मुलाखती सांगितले की,’ भारतातील काही राज्यात असलेली इम्युनिटी कमी तर काही भागात जास्त इम्युनिटी आहे. यामुळे येत्या दिवसांमध्ये देशाच्या विविध भागात करोनाची स्थिती अशीच वर-खाली राहण्याची खूप खूप शक्य आहे.
त्या पुढे म्हणाला,’ ज्या भागात किंवा गटांना पूर्वी पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत लागण झालेली नाही. ज्या भागात फारसे लसीकरण झालेले नाही अशा ठिकाणी रुग्णवाढ उच्चांकी दिसेल आणि ही स्थिती पुढील अनेक महिने राहील.’
दरम्यान,तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना करोनाचा जास्त धोका नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. लॅन्सेट या मासिकात या विषयीचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. ज्या मुलांना करोना होतो ती सहा दिवसांत बरी होतात. चार आठवड्यांहून अधिक काळ करोनाची लक्षणे राहिलेल्या मुलांचे प्रमाण अवघे ४ टक्के होते.