मुंबई: भीमा-कोरेगाव प्रकरणात कोणते गुन्हे गंभीर आहेत, कोणत्या गुन्ह्यांमध्ये कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक गुंतवले गेले आहे, याची सविस्तर माहिती घेऊन योग्य निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकार घेईल. महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार कुणावरही अन्याय करणार नाही. दंगल घडवण्याचा हेतू नसणाऱ्यांचे गुन्हे मागे घेण्याबद्दल विचार केला जाईल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.
भाजप सरकारचे प्रकल्प बंद करण्याबाबत जयंत पाटील म्हणाले, राज्यासाठी काही प्रकल्पांमध्ये मागील सरकारने पैसे गुंतवले आहेत. त्यामुळे हे प्रकल्प पूर्ण करावेच लागतील. मात्र, महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार आल्यानंतर त्या प्रकल्पांची कार्यक्षमता कशी वाढवता येईल व खर्च कमी कसा होईल, यावर आम्ही भर देणार आहोत. महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती पाहता आम्हाला महाराष्ट्राची काळजी आहे. जे प्रकल्प सुरू आहेत ते बंद करणार नाही पण काही प्रकल्पांची माहिती घेतली जाईल आणि निर्णय घेतले जातील