इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस दलाच्या तळावरील घटना, हल्लेखोरानेही सोडले प्राण
रांची : इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस दलाच्या कर्मचाऱ्याने सहकाऱ्यांवर केलेल्या गोळीबारात पाच जण मरण पावले तर अन्य अन्य दोन जखमी झाले. गोळीबार करणाऱ्या जवानाचाही या घटनेत मृत्यू झाला. मात्र त्याने आत्महत्या केली की त्याला एखाद्या सहकाऱ्याने गोळी घातली हे स्पष्ट होऊ शकले नाही. छत्तीसगढमधील बस्तर विभागातील नारायणपूर जिल्ह्यात ही घटना घडली. सकाळ आठच्या सुमारास ही दूर्देवी घटना कडेनर या गावातील तळावर घडली असल्याचे पोलिस महासंचालक पी. सुंदरराज यांनी सांगितले.
किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून हवलदार मसुदूल रहमान याने आपल्या जवळच्या शासकीय शस्त्राने हा गोळीबार केला. त्यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य तीन जण जखमी झाले. जखमी झालेल्या अन्या एका जवानाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. रहमान याचाही या घटनेत मृत्यू झाला. मात्र त्याचा मृत्यू त्याने आत्महत्या केल्याने झाला की प्रत्यत्तरादाखल अन्य एका सहकाऱ्याने केलेल्या गोळीबारात झाला याची माहिती तातडीने उपलब्ध होऊ शकली नाही.
यायबात जवानाकडील शस्त्र जप्त करून त्याने स्वत:वर गोळी झाडली का? याचा तपास करण्यात येत आहे. यायबाबत अधिक तपशील अजून मिळावयाचा आहे, असे पोलिस महासंचालकांनी सांगितले. जखमी झालेल्या दोन जवानांना रायपूर येथील रुग्णालयात हेलिकॉप्टरने हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजकनक आहे.
या हल्ल्यात मरण पावलेल्या जवानांची ओळख पटली असून त्यांची नावे हवालदार महेंद्र सिंग, दलजितसिंग आणि सूरजित सरकार अशी आहेत. तर जखमींची नावे एस. बी, उल्हास आणि सीताराम डून अशी आहेत.
(हि बातमी विकसित होणारी आहे. त्यात आणखी माहिती उपलब्ध होऊ शकते. ती मिळाताच बातमी अद्यायावत करण्यात येईल)