लोणी देवकर, (वार्ताहर) – उजनी धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होऊ लागल्याने उघड्या पडलेल्या गाळपेर जमिनीमध्ये पिके घेण्यासाठी येथील शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाल्याचे दिसत आहे.
उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग झाल्याने धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होऊ लागल्याने येथील शेतकऱ्यांचे विजपंप व केबल पाईपलाईन दिवसात फुटभर पाणी कमी झाल्याने पाण्याबाहेर पढत आहेत. त्यामुळे एनरखरखत्या उन्हात उभी पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
तर दुसऱ्या बाजूला धरणातील पाणीसाठा कमी होऊ लागल्याने उघड्या पडलेल्या गाळपेर जमिनित येथील शेतकऱ्यानी कडवळ ,मकवान, भुईमुग आदींसह पालेभाज्या व इतर उन्हाळी पिके घेण्यासाठी येथील शेतकऱ्यांची लगबग वाढली असल्याचे दिसतआहे. त्यामुळे एकंदरीतच शेतकऱ्यांची गाळपेर जमिनींमध्ये पीक घेण्यासाठी धडपड झाली आहे.