मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला सात वर्ष पुर्ण झाली आहेत. मोदी सरकारने या सात वर्षाच्या काळात काय केले याचा विरोधकांनी पाडाच वाचायला सुरुवात केली आहे. कॉंग्रेसने यानिमीत्ताने मोदी सरकारवर निशाणा लगावला आहे. ”मोदी सरकारची ७ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल जनतेला भेट – महाराष्ट्रात जवळपास ३० जिल्ह्यात पेट्रोल ने शंभरी पार केली. ७० वर्षात पेट्रोल डिझेल वर प्रचंड अन्याय झाला होता. मोदींनी पेट्रोल डिझेलवरचा अन्याय दूर केला आहे.” असा टोला आज कॉंग्रेस नेते व प्रवक्ते सचिन सावंत यांनी मोदी सरकारला लगावला आहे.
सचिन सावंत म्हणाले की, ”मोदी सरकारची ७ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल जनतेला भेट – महाराष्ट्रात जवळपास ३० जिल्ह्यात पेट्रोल ने शंभरी पार केली. ७० वर्षात पेट्रोल डिझेल वर प्रचंड अन्याय झाला होता. मोदींनी पेट्रोल डिझेलवरचा अन्याय दूर केला आहे.”
”मोदी सरकार जनतेला संकट काळात मदत करण्याऐवजी सूड उगावत आहे. काँग्रेस ने २०१४ ला सत्ता सोडली त्यावेळी क्रूड ऑइल १०८ डॉलर होते. व पेट्रोल जवळपास ₹ ७० होते. आज क्रूड ऑइल जवळपास ६७ डॉलर आहे पण पेट्रोल १०० पार गेले आहे. गेले ७ वर्षे पेट्रोल डिझेल वर एक्साईज ड्युटी लावून २० ते २५ लाख कोटी काढले. गेले कुठे? मोदी सरकारचे कर्तृत्व यातून दिसते.” असा सवाल सुद्धा सावंत यांनी केला आहे.
नरेंद्र मोदी यांच्या सरकारला सत्तेत येऊन सात वर्ष झाली आहेत. यासंदर्भात कॉंग्रेसकडून मुंबईत ‘7 वर्षात ना केला विकास, मोदींनी केला देश भकास’ अशी बॅनरबाजी करत मोदीसरकार विरोधात कॉंग्रेसच्या नेत्यांकडून हाताला काळ्या फिती बांधून काल मुंबईत निदर्शनं करण्यात आली होती. यामध्ये अनेक कॉंग्रेस नेत्यांनी सहभाग नोंदवला होता.