नगर -प्रत्येक गरजूंना मदतीचा हात या भावनेने राष्ट्रवादीचे कार्य सुरु आहे. राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देऊन सर्वसामान्यांची कामे राष्ट्रवादीच्या माध्यमातून केली जात आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने नगर तालुक्यातील सारोळाबध्दी येथील भैरवनाथ मंदिर देवस्थानसाठी पाण्याची टाकी भेट देण्यात आली. या टाकीच्या लोकार्पणप्रसंगी आमदार जगताप बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, ओबीसी सेलचे अमित खामकर, बाबासाहेब गाडळकर, दीपक खेडकर, संतोष लांडे, सरपंच सचिन लांडे, बाळासाहेब पुंड, आकाश हजारे, सिध्दू ठोंबरे, दिलदारसिंग बीर, आरिफ शेख, संतोष ढाकणे आदी उपस्थित होते.
यावेळी विधाते म्हणाले की, आ. जगताप यांच्या वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या निमित्त जमा झालेले शैक्षणिक साहित्य शाळा सुरु झाल्यावर गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागात देखील विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.