सातारा : चिनमध्ये सध्या कोरोना या व्हायरसने थैमान घातले आहे. अशा परिस्थितीमध्ये चिन सरकारने लोकांना घराबाहेर पडण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे मुळची सातार्याची असलेली अश्विनी पाटील ही सध्या चिनमध्ये अडकली आहे.
या पार्श्वभूमीवर अश्विनीची आई अमृता पाटील यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने बातचीत केली आहे. अश्विनीची आई अमृता पाटील म्हणाल्या अश्विनीकडील सर्व खाद्यपदार्थ संपत आले आहेत. तसेच तिच्याकडे पिण्याचे पाणीही नाही. भारत सरकारने माझ्या लेकीला तातडीने मायदेशी आणावे अशी मागणी त्यांनी केली आहे.