शेवगाव – येथील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विविध धर्मगुरुंच्या उपस्थितीत शेवगावात रमजान इफ्तार कार्यक्रम करण्यात आला. ज्ञानदेव बटुळे महाराज, मौलाना आबेद हाफिजसहाब, पास्टर संदीप मगर, मौलाना अब्दुल गणी हाफिजसहाब, वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम साजरा करण्यात आला.
यावेळी वाघोली विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन शेषराव आव्हाड, माजी चेअरमन दिलीप आव्हाड, फिरोज शेख, प्रा. विजय हुसळे, लक्ष्मण मोरे, सागर गरुड, प्रसाद गरुड, अझहर शेख, अन्सारभाई कुरैशी, अशोक बिडे, इन्सानियत फांउडेशन अध्यक्ष शेख ईस्माइल, अशोक शिंदे, सागर गरुड, शेख अकरम बाबा, चंद्रकांत थोरात, आदिनाथ जगधने, संतोष गायकवाड, विष्णु तुजारे, रविंद्र सर्जे उपस्थित होते.
यावेळी सर्व धर्मीय गुरुजनांचा सत्कार करण्यात आला. प्रा. चव्हाण म्हणाले, देशामध्ये धर्मांध शक्ती डोकेवर काढु पहात आहे. त्यांचे हे देशद्रोही कृत्य सर्व समाज बांधवांनी गाडुन टाकले पाहीजे. देशामध्ये सर्व जातीधर्माचे समाज बांधव गुण्यागोंविदाने रहात आहेत. त्यामुळे अशा कार्यक्रमांची समाजाला गरज आहे.