मुंबई – भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक व माजी कसोटीपटू रवी शास्त्री यांनाही आत्मप्रौढी दाखवण्याचा मोह आवरलेला दिसत नाही. आमच्या काळी आयपीएल स्पर्धा असती तर मलाही कोट्यवधींचा करार मिळाला असता, असा दावा शास्त्री यांनी केला आहे.
बीसीसीआयने आयपीएल स्पर्धा सुरू केल्यावर अनेक खेळाडूंवर करोडो रुपयांची बोली लागलेली पाहून मलाही माझी कामगिरी आठवली. 1980 सालच्या दशकात जर अशी स्पर्धा असती तर मलाही तब्बल 15 कोटी रुपयांना कोणत्याही संघाने खरेदी केले असते तसेच माझ्याकडेच कर्णधारपदही दिले असते, असेही शास्त्री म्हणाले.
काळ बदलला व भारतीय क्रिकेटकडे पैसा आला. देशात नवोदित गुणवान खेळाडूंची खाण निर्माण झाली आहे. आयपीएल स्पर्धेने भारताच्या संघाला सेकंड बेंच दिला हेच या स्पर्धेचे सर्वात मोठे यश आहे, असेही शास्त्री म्हणाले.