नवी दिल्ली – भारताचे चारित्र्य कधीही कोणत्याही देशावर हल्ला करणे किंवा त्याची एक इंच भूमी बळकावणे असे नाही. परंतु आम्ही संकल्प केला आहे की जर कोणी आमचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला तर कोणीही वाचणार नाही, असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath singh) यांनी केले आहे.
छत्तीसगडमधील (Chhatisgadh) सीतापूर, भरतपूर-सोनहट आणि पाटण विधानसभा मतदारसंघात निवडणूक (Vidhansabha Election 2023) सभांना संबोधित करताना राजनाथ सिंह (Defense Minister) बोलत होते. राज्यात भाजपची सत्ता आल्यास येत्या तीन-चार वर्षात राज्यातून नक्षलवाद संपुष्टात येईल आणि सक्तीचे धर्मांतर रोखले जाईल, असेही ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या नेतृत्वाखाली भारत एक शक्तिशाली देश म्हणून उदयास आला असून जगात त्याची प्रतिष्ठा वाढली आहे. भारत ही जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे आणि अर्थतज्ज्ञ आणि वित्तीय संस्थांच्या मते भारत पुढील तीन वर्षांत जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांपैकी एक असेल. इतर दोन देश अमेरिका आणि चीन असतील, असेही ते म्हणाले.
भारत (powerfull India) आता कमकुवत देश राहिलेला नाही, तर शक्तिशाली देश बनला आहे. भारताकडे कोणीही डोळे वटारुन बघू शकत नाही. पाच-सहा वर्षांपूर्वी पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी आमच्या सीमेत घुसून रात्रीच्या वेळी भ्याड हल्ला करून आमचे शूर जवान शहीद केले होते. पंतप्रधान (नरेंद्र मोदी) यांनी बैठक बोलावली आणि 10 मिनिटांत निर्णय घेण्यात आला. यानंतर देशाने पाहिले की, सीमेच्या या बाजूला असलेल्या दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करण्यात आपल्या शूर सैनिकांना यश आले आणि सीमेपलीकडे घुसून त्यांचा खात्मा केला असंही राजनाथ यांनी यावेळी सांगितलं.