मुंबई: मागील काही दिवसांपासून आऊटगोइंग कॉलची रिंग 25 सेकंद वाजणार की 40 सेकंद यावरून वाद सुरू होता. आता अखेर सगळ्या कंपन्यांनी हे ड्युरेशन 25 सेकंदाचं केलं आहे. त्यामुळे तुमच्या फोनवर आलेल्या कॅलची रिंग फक्त २५ सेकंदच वाजणार आहे. त्यानंतर लगेच फोन कट होणार आहे.
आता टेलिकॉम कंपन्यांमधून एक अजब नियम समोर आला असून, या नियमानुसार येणाऱ्या फोनची रिंग फोन 25 सेकंदच वाजणार आहे. जिओने आपल्या नेटवर्कमधून आऊटगोइंग कॉल्सची रिंग ड्युरेशन कमी करून 25 सेकंद केली होती. त्यानंतर या ड्युरेशन बद्दलच्या वादाला तोंड फुटले होते. त्यामुळे आता जिओ नंतर वोडाफोन, एअरटेल, आयडीया यासारख्या कंपन्यांनी देखील हि वेळ ४० सेकंद ऐवजी २५ सेकंड केली आहे.
दरम्यान इंटरकनेक्ट उपयोग शुल्क (IUC) कढून जे चार्ज लागतं ते कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या नेटवर्कवरून फोन केला जातो तो समोरच्या नेटवर्कला IUC शुल्क देतात. हा चार्ज प्रति मिनीटाच्या आधारावर दिला जातो. वेळ कमी केल्यामुळे फोन उचलता येईलच असं नाही. यावरून मिस्ड कॉलची संख्या वाढेल. मिस कॉल पाहिल्यानंतर फोन करण्याची शक्यता अधिक आहे. यामुळे IUC चा भार दुसऱ्या नेटवर्कवर जाईल. त्यामुळे हा नियम लागू करण्यात आला असल्याचं बोललं जात आहे.
तर टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडियाने (TRAI) रिंग वाजण्याच्या वेळवर अद्याप कोणताही निर्णय दिला नाही. 14 ऑक्टोबर रोजी चर्चा करून देणार यासंदर्भात निर्णय देण्यात येणारआहे.