नवी दिल्ली – उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधानांवर जहरी टीका केली होती. पंतप्रधान मोदींनी केवळ राजकारणासाठी आपल्या पत्नीला सोडले असा आरोप त्यांनी केला होता. आपला पती मोदींच्या जवळ जाऊ नये असे भाजपमधील महिलांना कायम वाटत असते कारण मोदींप्रमाणे आपले पतीही आपल्याला सोडून देतील अशी भीती त्यांच्या मनात असते असे आक्षेपार्ह विधानही मायावती यांनी केले होते. या आक्षेपार्ह विधानावर भाजपने जोरदार आक्षेप घेतला होता.
अशातच आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मायावतींच्या त्या वादग्रस्त विधानावरून त्यांना चांगलाच टोला लगावला आहे. रामदास आठवले म्हणाले, “मायावती या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पत्नीबाबत वक्तव्य करीत आहेत. मात्र मायावती यांचा विवाह झाला नसल्याने त्यांना घर संसाराबाबत काहीही माहीत नाहीये. जर मायावतींचा विवाह झाला असता तर त्यांना समजलं असतं पतीला कशाप्रकारे हाताळले जाते. आम्ही मायावतींचा सन्मान करतो पण त्यांनी अशी वक्तव्य करायला नको होती.”
Union Minister Ramdas Athawale: Mayawati is making remarks about Modi Ji & his wife. She (Mayawati) is not married, she doesn’t know what a family is, had she been married she would have known how to handle a husband. We respect Mayawati, she should not make such statements. pic.twitter.com/fGCIb9nuZW
— ANI (@ANI) May 17, 2019