नांदेड – “शिंदे गटातील १६ आमदार अपात्र ठरले तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे २२ आमदार तयार ठेवले आहेत” असं खळबळजनक विधान ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केलं होत.त्यामुळे शिंदे गटाच्या आमदारांवर न्यायालयाने कारवाई केली तर या सरकारच्या भविष्याचा काय होणार याबाबत जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत. अशात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी देखील याबाबत वक्तव्य केलं आहे.
काही महिन्यांपूर्वी काँग्रेस नेते अशोक चव्हाण हे भाजपत प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु होत्या.जर 16 आमदार बरखास्त झाले तर नांदेड आणि लातूरकर फडणवीस यांच्या मांडीवर बसायला तयार आहेत असं सूचक विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. नांदेडमध्ये सुरु असलेल्या धम्म मेळाव्यात प्रकाश आंबेडकर बोलत होते.
प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर देखील जोरदार निशाणा साधला. काँग्रेस वाले म्हणतायत, आमचं काय शिल्लक राहिलंय? त्यामुळे जे वाचलंय, ते वाचवण्यात ते हित पाहत आहेत, काँग्रेसमधील नितीमत्ता संपली आहे. दहापिढ्या बसून खाता येईल इतकं त्यांच्याकडे आहे अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.