IAS Shreedhanya Suresh। असं म्हणतात केवळ स्वप्न मोठी असून उपयोग नसतो तर ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाच्या अंगी जिद्द हवी असते. ती जिद्दच माणसाला त्याच्या इच्छित ध्येयाजवळ घेऊन जाते. याच जिद्दीच्या जोरावर अत्यंत कठीणातील कठीण प्रसंग सुद्दा लीलया पेलण्याची क्षमता निर्माण होते. अशीच क्षमता केरळच्या एका मुलीच्या अंगी आली आणि ती आज लाखो महिलांसाठी प्रेरणा बनली. आजची success story ही केरळच्या आदिवासी भागातील महिलांसाठी आदर्श बनलेल्या पहिल्या आदिवासी IAS श्रीधन्या सुरेश यांची..ज्यांनी कठीण प्रसंगावर मात करत आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचं चीज केलंय…
श्रीधन्या सुरेश यांचे नाव फारसे प्रसिद्ध नाही पण त्यांचा संघर्ष चर्चेच्या विषयापेक्षा काही कमी नाही. श्रीधन्या सुरेश या 2018 कॅडरच्या IAS अधिकारी आहेत. आयएएस पदापर्यंत पोहोचणे हा श्रीधन्या सुरेशसाठी काटेरी रस्त्यासारखाच होता. पण तरी श्रीधन्याने आपल्या स्वप्नांशी तडजोड केली नाही. कठोर परिश्रम आणि संघर्षाच्या जोरावर त्यांनी यश मिळवलं.
श्रीधन्या सुरेश या केरळमधील सर्वात मागासलेल्या वायनाड जिल्ह्याच्या रहिवासी आहेत. आपल्याविषयी माहिती देताना श्रीधन्या सुरेश यांनी, “माझ्या आजूबाजूच्या जिल्ह्यातून आजपर्यंत कोणीही यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाले नव्हते, लोकांनाही आतापर्यंत यूपीएससी किंवा आयएएसबद्दल माहिती नव्हती, पण मला विश्वास आहे की माझ्या या यशाने प्रेरित होऊन इथले तरुण आता पुढे येतील.” असा विश्वास व्यक्त केला. .वायनाडमधील एका छोट्याशा शाळेतून त्यांनी सुरुवातीचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांनी सेंट जोसेफ कॉलेज (कालिकत), कोझिकोट येथून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. ग्रॅज्युएशननंतर श्रीधन्याने प्राणीशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवली.
वसतिगृहात वॉर्डन म्हणून काम केले IAS Shreedhanya Suresh।
यानंतर कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी राज्य शासनाच्या अनुसूचित जमाती विकास विभागात लिपिक म्हणून नोकरी केली. त्या दिवसांत श्रीधन्याचे कुटुंब आर्थिक आर्थिक परिस्थिती अत्यंत हलखायची होती. गरिबी इतकी होती की त्यांच्या कुटुंबाला दोन वेळचे जेवण मिळणेदेखील कठीण झाले होते. यामुळेच त्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात वॉर्डन म्हणूनही काम केले. पण त्याच दरम्यान त्यांनी आयएएस श्रीराम सांबा राव यांना पाहिले, लोक रांगेत त्यांची वाट पाहत होते, हे पाहून त्यांना श्रीधन्या यांना एक प्रेरणा मिळाली आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या स्वप्नाची सुरुवात झाली. स्वपपूर्तीसाठी त्यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली.
वडील धनुष्यबाण विकायचे, आई मनरेगामध्ये काम करायची
ध्येय लांब होते आणि वाट खूप अवघड होती, या मार्गावर चालणे श्रीधन्यासाठी अडचणीचे होते, पण तिने हार मानली नाही आणि कठोर परिश्रम आणि संघर्षाच्या जोरावर आपले स्वप्न साकार केले. एका मुलाखतीदरम्यान श्रीधन्याने, तिचे वडील कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी रोजंदारी मजूर म्हणून काम करायचे, त्याशिवाय ते गाव आणि शहरांमध्ये जाऊन धनुष्यबाण बनवायचे आणि विकायचे. आई मनरेगामध्ये काम करायचीअशी माहिती दिली होती, त्यांनी सांगितले की, इतर आदिवासी कुटुंबांप्रमाणे माझ्या आई-वडिलांनी माझ्यावर कोणतेही बंधन घातले नाही. आमचं कुटुंब खूप गरीब होतं, पण माझ्या आई-वडिलांनी माझ्या अभ्यासात गरिबी कधीच येऊ दिली नाही. असे त्यांनी अभिमानाने सांगितले होते.
तिसऱ्या प्रयत्नात UPSC उत्तीर्ण IAS Shreedhanya Suresh।
श्रीधन्याने 2016 आणि 2017 मध्ये पहिल्यांदाच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत भाग घेतला होता. मात्र प्रिलिममध्ये अपात्र ठरल्यामुळे तिला पुढील निवड प्रक्रियेत सहभागी होता आले नाही. त्यानंतर , श्रीधन्याने हार मानली नाही आणि 2018 मध्ये पुन्हा एकदा UPSC परीक्षा दिली आणि तिसऱ्या प्रयत्नात 410 वा क्रमांक मिळवून संपूर्ण समाजाची मान उंचावली.
मुलाखतीला जाण्यासाठी पैसे नव्हते
श्रीधन्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरली. मात्र त्यानंतरही त्यांची आव्हाने काही पाठ सोडत नव्हती. यूपीएससीच्या मुलाखतीसाठी दिल्लीला जाण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. यामुळेच कुटुंबात एकीकडे आनंद तर दुसरीकडे चिंतेचे वातावरण होते. मात्र जेव्हा त्यांच्या मित्रांना ही गोष्ट समजली तेव्हा त्यांनी सर्वांनी एकत्र येत पैसे गोळी केले. त्यातून 40 हजार रुपयांची व्यवस्था झाली. यानंतर, श्रीधन्या यांनी अनात्म फेरीसाठी दिल्ली गेल्या आणि अंतिम फेरी उत्तीर्ण झाल्या. यावेळी त्यांना ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्वांचे मनापासून आभार मानले.
दरम्यान, दिल्लीची मेन्स क्लीअर केल्याने त्या आदिवासी भागातून पहिल्या महिला IAS बनत सर्व समाजासमोर एक आदर्श निर्माण करून दिला.
कठोर परिश्रम आणि संघर्षाने, एखादी व्यक्तीमोठ्यातलं मोठं यश मिळवू शकते… हे केरळच्या पहिल्या आदिवासी महिला IAS श्रीधन्या सुरेश यांनी त्यांच्या जिद्दीच्या जोरावर मिळवलेल्या यशाने सिद्ध होते. आज श्रीधन्या हजारो आदिवासी तरुणांसाठी प्रेरणा बनल्या आहेत.