मुंबई – राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद हे घटनात्मक पद आहे. ते स्वीकारण्यापूर्वी मी राष्ट्रवादी काँग्रेसमधील पद सोडले होते. त्यामुळे राज्यात सत्तापरिवर्तन होऊन नवं सरकार सत्तेवर आलं तरी हे पद सोडण्याचा प्रश्नच उदभवत नाही असं म्हणत महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर आलेल्या रूपाली चाकणकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
राज्यातील सत्तांतरानंतर रोज नवनवीन खुलासे ,दावे-प्रतिदावे सत्ताधारी आणि विरोधकांकडून करण्यात येत आहेत. यातच महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर आलेल्या रूपाली चाकणकर यांनी आपल्या पदाबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. राज्यात सरकार बदललं तरी मी महिला आयोगाचं अध्यक्षपद सोडणार नाही असेही त्या माध्यमांशी बोलतांना म्हणाल्या आहे.