मुंबई : राज्याच्या राजकारणात घडलेल्या राजकीय भूकंपनाट्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते पदी विराजमान झालेले अजित पवार यांनी रविवारी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता भाजपाची यापुढे वाटचाल कशी असणार? तसंच राजकारणात पुढे काय काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने केलेले एक ट्वीट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या ट्विटमध्ये,”जितेंद्र आव्हाड या नावाची ओळख आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यामुळे आहे.माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला वेळोवेळी संधी देत त्यांनी इथवर आणलं. आज गुरुपौर्णिमा. माझं आयुष्य घडवणाऱ्या माझ्या या गुरुंना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..! शेवटी इतकंच सांगतो की,शेवटच्या श्वासापर्यंत “शरदचंद्रजी पवार” या नावासाठी लढू.” असे म्हटले आहे.
जितेंद्र आव्हाड या नावाची ओळख आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यामुळे आहे.माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला वेळोवेळी संधी देत त्यांनी इथवर आणलं.
आज गुरुपौर्णिमा.
माझं आयुष्य घडवनाऱ्या माझ्या या गुरुंना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..! शेवटी इतकंच सांगतो की,शेवटच्या… pic.twitter.com/m2oodUdW0A— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 3, 2023
महाराष्ट्र सरकारला म्हणजेच शिंदे-फडणवीस सरकारला एक वर्ष आणि दोन दिवस झालेले असतानाच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. फक्त अजित पवारच नाही तर त्यांच्या सोबत , छगन भुजबळ यांच्यासह नऊ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. शरद पवार यांनी यावर आपली भूमिका मांडली. तसेच पक्षाचा यापुढे आश्वस्त चेहरा म्हणजे शरद पवार हे नाव घेतले. त्यामुळे पुन्हा एकदा शरद पवार पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर देणार असल्याचे दिसून येत आहे.