मुंबई- विधानसभा निवडणुकीत युती होणार आणि मीच पुन्हा मुख्यमंत्री बनणार, असा विश्वास फडणवीस यांनी बोलून दाखवला. जागावाटपावरून भाजप आणि शिवेसना या मित्रपक्षांमध्ये तणातणी सुरू असल्याने युतीत संशयकल्लोळ निर्माण झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत.
मात्र, त्या बातम्यांवर विश्वास ठेऊ नये. जागावाटपाची बोलणी सुरू आहे. जागावाटपाची माहिती पत्रकार परिषदेत दिली जाईल, असे फडणवीस यांनी म्हटले.
राज्य मंत्रिमंडळाने सर्व निर्णय शिवसेना मंत्र्यांच्या पाठिंब्याने एकमताने घेतले. कुठल्याच निर्णयाबाबत शिवसेनेच्या एकाही मंत्र्याचे दुमत नव्हते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.