मुंबई – हिंदी चित्रपटसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे बिग बी म्हणून अमिताभ यांची लोकप्रियता आजही तशीच कायम आहे. अमिताभ यांनी चार दशकांहून अधिक मोठ्या कारकीर्दीत अनेक चित्रपटांत अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अमिताभ हे भारतीय चित्रपटाच्या इतिहासातील सर्वात महान आणि प्रभावशाली अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांचा अभिनयामुळे ते नेहमीच चर्चेत असतात. त्यांचा चाहता वर्ग हा प्रत्येक वयोगटातला आहे. आणि याच कारणामुळे आता महानायक अमिताभ बच्चन पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
नुकतंच अभिनेते अमिताभ बच्चन यांनी आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली असून, यामध्ये त्यांनी एक किस्सा सांगितला आहे. अमिताभ बच्चन गेली 40 वर्षे दर रविवारी आपल्या ‘जलसा’ बंगल्या बाहेर येऊन चाहत्यांना भेटतात, त्याचाच हा किस्सा आज त्यांनी सर्वांशी शेअर केला आहे. 1982 पासून हा भेटीचा कार्यक्रम आजपर्यंत सुरूच आहे.
View this post on Instagram
कधी गर्दी कमी असते तर तूफान जमाव होतो. दरम्यान, 19 फेब्रुवारी रोजी चाहत्यांची तोबा गर्दी झाली. त्याचेच काही फोटो अमिताभ यांनी शेअर केले आहेत. यामध्ये ते म्हणतात, ‘हे प्रेम.. जे 1982 पासून प्रत्येक रविवारी मला भरभरून अनुभवता येतं. या प्रेमपुढे मी हात जोडून आणि गुडघे टेकून नतमस्तक आहे. ये प्यार , हर इतवार .. आभार आभार आभार .. परम आभार’ असे त्यांनी लिहिले आहे. त्यांची ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत असून सगळीकडे मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील होत आहे.