मुंबई – ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या वादामुळे जितेंद्र आव्हाड चांगलेच चर्चेत आले होते. हा वाद काहीसा कमी होतो न होतो तोच एका नव्या वादाला तोंड फुटले. एका महिलेने आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच आव्हाड यांनी माझ्या विरोधात खोटे गुन्हे दाखल केल्याचे म्हणत आपण राजीनामा देणार असल्याची घोषणा केली.
पोलीसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासात २ खोटा गुन्हा दाखल केला आणि तोही ३५४ ,., मी ह्या पोलिसी आत्याचारा विरुद्ध लढणार .. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे,,. लोकशाहीची हत्या .. उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत अशा आशयाचे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. तर यावेळी आव्हाड समर्थक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मुंब्रा रस्त्यावर उतरत समर्थकांनी काही काळ रास्ता अडवून ठेवला होता.
पोलीसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासात २ खोटा गुन्हा दाखल केला आणि तोही 😭३५४ ,.,
मी ह्या पोलिसी आत्याचारा विरुद्ध लढणार … मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे,,. लोकशाहीची हत्या .. उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 14, 2022
कळवा-खाडी पुलाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्र्यांसह आव्हाड आणि खासदार श्रीकांत शिंदे देखील उपस्थित होते. याच कार्यक्रमात आरोप करणारी महिला देखील उपस्थित होती. कार्यक्रमादरम्यान आव्हाड यांनी शरीराला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करून बाजूला केल्याचा आरोप महिलेने केला आहे. याअंतर्गत मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.