कोपरगाव मतदार संघात करोनाच्या संसर्गजन्य प्रादुर्भावानू जनतेवर आलेल्या या संकटावर मात करण्यासाठी जी मदत लागेत ती गरजू जनतेपर्यंत पोहचविण्या बरोबर या संकटकाळी लोकप्रतिनिधी म्हणून मी जनतेच्या सेवेसाठी सज्ज आहे. प्रशासनाने सर्वसामान्य नागरीक, शेतकरी,शेतमजूर यांना या कठीन काळात सहकार्य करावे असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले.
राज्यासह जिल्ह्यात करोनाच्या भितीने संपुर्ण जनजीवन विस्कळीत होत आहे. सर्वसामान्य नागरीकांच्या समस्यासह करोनाचा भावी धोका लक्षात घेवून योग्य त्या उपाययोजना राबविण्या बरोबर मतदार संघातील सध्य स्थितीचा आढावा जाणून घेण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी संबधीत विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक तहसील कार्यालयात बुधवारी घेतली. यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे,ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते,पालिका मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, पोलीस निरीक्षक अनिल कटके, राकेश माणगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी आमदार काळे यांच्या समोर कोपरगाव तालुक्यातील करोनावर मात करण्यासाठी उपलब्ध केल्या सुविधा व संशयित रुग्ण व त्यांची केलेली वैद्यकीय तपासणी अहवालाची माहीती काळे यांनी जानून घेत योग्य त्या सुचना अधिकाऱ्यांना करताना पोलीस प्रशासनाच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली, तालुक्यासह शहरात सर्वकाही बंद आहे पण अवैद्य व्यवसाय जोरात सुरू आहेत. विषेशतः कोपरगाव शहर पोलील स्टेशनच्या हद्दीत कोकमठाण व शहरात सर्वाधिक अवैद्य व्यवसाय मोठ्या प्रमात सुरू आहेत . पोलीसांचा वचक राहीला नाही का ? १४४ कलम लागु असुनही खूले आम दारु विकली जाते, इतर अवैद्य व्यवसाय चालु आहेत याकडे लक्ष द्यावे. यातुन लोक एकत्र येवून करोनाची बाधा होण्याची शक्यता आहे असे म्हणत पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांना काळे यांनी तहसीलदार व पत्रकार अधिकारी यांच्या समक्ष धारेवर धरले. सर्वसामान्य नागरीकांना पोलीसी त्रास देवू नये अशी सुचना केली.
यावेळी आरोग्य विभागाने भविष्यातील करोनाची गंभिरता ओळखून करोना बाधीत व संशयित रुग्णांवर ऐनवेळी उपचार करण्याची वेळ आली तर त्यासाठी ४२५ बेड,२४ व्हेंटिलेटर सुविधांची तयारी केली आहे तसेच तालूक्यासह शहरात विदेशातुन व मुंबई- पुणे येथून आलेल्या नागरीकांची शोधमोहीम सुरू केली असुन शहरातील शारदानगर,अंबिकानगर याभागातून एकाच दिवशी तब्बल ६८ नागरीकांना शोधुन कढुन त्यांची आरोग्य तपासणी करुन आरोग्य विभाघाच्या निगरनीखाली दक्ष व सुरक्षीत रहण्याच्या सुचना देवुन त्यांच्या हातावर शिक्के मारण्यात आले आहे. या सर्वांना करोनाचे कोणतेही लक्षणे नसल्याने घरी एकांतात रहण्याचा सुचना दिल्याची माहिती डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली. तहसीलदार योगेश चंद्रे यांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवहान नागरीकांना केले आहे.
दरम्यान, आशुतोष काळे यांनी नागरीकांना आवहान करताना म्हणाले की, कोणीही घराबाहेर पडू नये प्रशासनाला सहकार्य करावे. आत्यावश्यक व आडचणीच्यावेळी काही गरज वाटली तर आपल्या यंत्रणेशी संपर्क साधण्याचे आवहान केले आहे. तसेच गरीब, मजुर,शेतमजूर यांना स्वस्त धान्य दुकानातुन मुबलक धान्य देण्या बरोबरच काही सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून अन्न,धान्य व इतर साहीत्या देण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती दिली. यावेळी पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी तालुक्यातील रवंदे गावच्या नागरीकाबद्दल तिवृ नाराजी व्यक्त केली.