संजय लीला भन्साळी यांचा “इंशाअल्लाह’ चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटात आलिया आणि सलमान खान प्रमुख भूमिकेत दिसणार होते. या चित्रपटाच्या निमित्ताने जवळपास 13 वर्षांनंतर सलमान हा संजय लिला भन्साळींसोबत काम करणार होते. त्यामुळे सर्वचजण चाहते या चित्रपटाविषयी खूपच उत्सुक होते.
मात्र सलमानने हा चित्रपट सोडला. कथानकातील हस्तक्षेपामुळे सलमान आणि भन्साळी यांच्यामध्ये मतभेद झाले आणि याच कारणामुळे सलमानने “इंशाअल्लाह’ सोडला अशी चर्चा आहे. आता या चित्रपटात सलमान ऐवजी हृतिकची वर्णी लागू शकते.
हृतिकने नुकतीच संजय लीला भन्साळी यांची भेट घेतली, अशी माहिती एका वृत्तपत्राने सुत्रांच्या हवाल्याने दिली आहे. मात्र या संदर्भात अधिकृत घोषणा अद्यापही करण्यात आलेली नाही. ऑगस्ट महिन्यात भन्साळी यांच्या निर्मिती संस्थेने “इंशाअल्लाह’चे काम पूर्णपणे थांबवण्यात आले असल्याची माहिती ट्विट करून चाहत्यांना दिली.
या ट्विटमुळे चाहते निराश झाले होते. मात्र हृतिक या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत त्यामुळे आता हृतिक या चित्रपटाला होकार देतो का? हे पाहण्यासारखं ठरणार आहे.