नवी दिल्ली : पेन आणि कागद घेऊन मीटिंग मधील मुद्दे टिपून घेणे ही गोष्ट मोबाईल आणि लॅपटॉप च्या जमान्यात कालबाह्य वाटत असली तरी यामुळे तुमच्यामध्ये किती चांगला आणि सकारात्मक बदल होऊ शकतो याविषयी…
पहिल्यांदा आपण याबाबत चे नियोजन बघू आणि मग ही संकल्पना काय आहे त्याचा विचार करू. याचे नियोजन अगदी सोपं आहे पहिल्यांदा एक फुल साइज नोटबुक घ्या त्याचबरोबर एक काळ्या किंवा निळ्या शाईचं पेन घ्या. एक हिरव्या शाईचे पेन सोबत ठेवा. जेव्हा कुठलाही मुद्दा कृतीत उतरवायचा असेल तेव्हा त्याखाली हिरव्या शाईने रेघ ओढा. जेव्हा एखादा मुद्दा महत्त्वाचा असेल तेव्हा त्याखाली लाल शाईने रेघ ओढा. हे अगदी सोपे नियोजन आहे.
आता ही संकल्पना काय आहे ते पाहू. जेव्हा तुम्ही मीटिंगमध्ये असता तेव्हा एखाद्या नदीच्या प्रवाहाच्या काठावर बसल्याप्रमाणे तुमचे वर्तन असते. किंबहुना मीटिंग संपली म्हणजेच प्रवाह पुढे निघून गेला, की त्यातील सगळ्याच गोष्टी लक्षात राहतात असे नव्हे. त्यामुळे तुमच्या नोट्स या वाहणाऱ्या नदीतील बेटांसारख्या असतात.
म्हणजेच तुम्ही मुद्दे टिपून घेतलेले असतात आणि योग्य त्या ठिकाणी लाल आणि हिरव्या शाळेच्या खुणा असतात. त्यातून तुम्ही पुन्हा त्या मिटिंग मधील प्रवाहाची केव्हाही सहजपणे उजळणी करू शकता. यातील लक्षात घेण्याचा मुद्दा म्हणजे निळ्या किंवा काळ्या शाईने तुम्ही महत्त्वाचे मुद्दे टिपून घेतलेले असतात किंवा ते मुद्दे भविष्यात संदर्भासाठी महत्त्वाचे असतात. जेव्हा तुम्ही हे मुद्दे एका आठवड्याने किंवा महिन्यांनी वाचता म्हणजेच एखादी टू डू लिस्ट करायची असते तेव्हा तुम्ही या मुद्यांकडे वेगळ्या दृष्टीने पाहता.
कल्पना करा, की जे ठरलेले आहे तेवढेच किंवा जे शिकवण्यात आलेले आहेत तेवढेच आपण शिकलो तर कदाचित आपण एखादी भाषा बोलायला देखील शिकू शकणार नाही. खरे तर आपल्याला मिळालेली प्रत्येक माहिती आपल्या आवडीनुसार फिल्टर होऊन ती आपल्या मेंदूमध्ये नोंदली जात असते आणि भविष्यातील आपली समज कशी असणार यातही या सगळ्या गोष्टींचे योगदान असते.
आपण कसा विचार करतो आपण कसे लिहितो या सगळ्यात याचे योगदान असते. त्यातही आपण कल्पनाही केलेली नसते अशा संकल्पना या भविष्यात सर्वोत्कृष्ट ठरतात. त्यामुळेच कुठलीही संकल्पना जन्माला येण्यासाठी तुमच्याकडे नोट्स असणे अतिशय आवश्यक ठरते. वेगवेगळ्या नवनव्या संकल्पना प्रत्यक्षात आणणाऱ्या व्यक्तींनी अनेकदा भरपूर लिखाण केलेले असते किंवा वेगवेगळ्या ठिकाणी हाताने लिहून नोट्स घेतलेल्या असतात. अनेकदा अशा नोट्स नंतर वाचल्या जात नाहीत.
कारण आपण त्या वाचता येतील अशा अक्षरात लिहिलेल्या नसतात, पण जर का तुम्ही नोट्स चांगल्या प्रकारे लिहून घेतल्या तर त्या नक्कीच वाचल्या जातात. तुम्ही घेतलेल्या नोट्स तुम्हाला जर का परत वाचाव्याशा वाटल्या नाहीत तर त्याचा काहीच उपयोग होत नाही. त्याउलट तुम्ही योग्य प्रकारे आणि उपयुक्त अशा नोट्स घेतल्या तर ते तुमच्याकडे एक जिवंत असे डॉक्युमेंट तयार राहते.