कराची – वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 सामन्यांच्या मालिकेत यजमान पाकिस्तानने निर्विवाद वर्चस्व राखले. पाकिस्तानने ही मालिका 3-0 अशी जिंकली. करोनाबाधित खेळाडूंना विलगीकरणात पाठवले गेल्याने वेस्ट इंडिजची बाजू दुबळी बनली होती. त्याचा पुरेपूर लाभ पाकिस्तानने घेतला.
या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात सलामीवीर महंमद रिझवानच्या 87 तर, कर्णधार बाबर आझमच्या 79 धावांच्या खेळीच्या जोरावर पाकिस्तानने वेस्ट इंडिजचा 7 गडी राखून पराभव केला व मालिका जिंकली.
वेस्ट इंडिजने विजयासाठी दिलेले 208 धावांचे आव्हान पाकिस्तानने 18.5 षटकांत पूर्ण केले. रिझवानला सामनावीर तसेच मालिकावीर पुरस्कारही मिळाला.