पुणे – मागील दहा दिवसांत रेल्वेच्या माध्यमातून तब्बल 11 हजार जण पुण्यात दाखल झाले आहेत. या सर्वांना घरीच विलग करण्यात आले आहे. त्यांच्या आरोग्याची दररोज फोन वरून माहिती घेण्यात येत आहे.
पुण्यात आलेल्या या नागरिकांमध्ये दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेश तसेच दक्षिणेतील राज्यातून आलेल्या नागरिकांचा समावेश आहे. दरम्यान, या नागरिकांमध्ये अद्याप एकही करोनाबाधित आढळेला नसल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. लॉकडाऊनमुळे देशभरात अडकलेले मजूर तसेच पर्यटन आणि इतर कौटुंबिक कारणांस्तव परराज्यांत गेलेल्यांना आपल्या राज्यात परत येण्यासाठी विमान तसेच रेल्वेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मागील दहा दिवसांत विशेष रेल्वे गाड्यांमधून सुमारे 11 हजार परतले आहेत. त्यात, कोणत्याही मजूरांचा समावेश नसला, तरी अनेक जण नोकरादार आहेत. तर बहुतांश जण पर्यटन तसेच धार्मिक यात्रांसाठी गेलेले नागरिक आहेत. लॉकडाऊननंतर प्रवासाची सुविधा मिळाल्याने हे नागरिक पुन्हा पुण्यात परतले आहेत. रेल्वे स्थानकावर या व्यक्तींच्या करोनासंदर्भातील आवश्यक तपासण्या केल्या जात आहेत.