नवी दिल्ली- ऑक्सिजनच्या अभूतपूर्व टंचाईमूळे दिल्लीच्या जयपूर गोल्डन रुग्णालयात 20 अत्यवस्थ बाधितांचा मृत्यू झाला. या रुग्णालयातील ऑक्सिजनची पातळी साठा नसल्याने खालावली, असे रुग्णालयाचे वैधकीय संचालक डॉ. डी. के. बलुजा यांनी सांगितले.
रुग्णालयात 200 जण उपचार घेत असून सकाळी पावणे अकरा वाजता केवळ अर्धा तास पुरेल एवढंच ऑक्सिजन शिल्लक होता. आम्ही प्रयत्नांची शर्थ करत आहोत, एवढेच सर्वजण सांगत आहेत.
कोणीही काहीही ठामपणे सांगत नाही, असे या वैद्यकीय संचालकांनी सांगितले. त्यांना या स्थितीत सरकारने काही मदत केली का असे विचारले होते त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
रुग्णालयात 200 जण दाखल असून त्यापैकी 80 टक्के जणांना ऑक्सिजन लावलेला आहे. 35 जण अतिदक्षता विभागात आहेत, असे डॉ. बलुजा यांनी सांगितले.