हिंगोली (शिवशंकर निरगुडे) : हिंगोली जिल्ह्यातील वसमत औंढा कळमनुरी तालुक्यातील 20 ते 25 गावांना आज पहाटे सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंपाची नोंद 3.5 स्केल एवढी नोंदवण्यात आली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत, औंढा नागनाथ, कळमनुरी तालुक्यातील मागील 8 ते 10 वर्षा पासून जमीनीतून आवाज येण्याचे प्रकार होत आहेत भूगर्भातील हालचालीमुळे हें आवाज येत असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. आज सकाळी 05.09 मिनीटांनी हिंगोली जिल्ह्यातील वसमत , औंढा कळमनुरी तालुक्यातील 20 ते 25 गावांना सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
या भूकंपाची तीव्रता 3.5 रिश्टर स्केल येवढी होती अशी माहिती जिल्हा प्रशासनच्या वतीने देण्यात आली आहे हिंगोली जिल्ह्यातील वसमत, औंढा, कळमनुरी तालुक्यातील सुमारे 20 ते 25 गावाच्या परिसरात आज सकाळी भूकंपाचे हादरे जाणवले आहेत.
वसमत तालुक्यातील कुरुंदा परिसरातील वापटी .कुपटी पांगरा शिंदे कळमनुरी तालुक्यातील बोल्डा परिसरात व औंढा तालुक्यातील पिंपळदरी जलालदाभा दुधाळा आदी गावच्या परिसरात आज सकाळी पाच वाजून नऊ मिनिटांनी भूकंपाचे हादरे बसल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने दिली आहे.