हिंगोली (प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे) हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील येहळेगाव गवळी या गावातील नंदगवळी समाजबांधवांनी दुधाची विक्री न करण्याची परंपरा आजही जपली आहे. यामागे कोणतीही अख्यायिका नाही. मात्र जुन्या पिढीने सांगितले आणि नव्या पिढीने परंपरा पुढे नेली. रोज गावात पाचशे लिटर दुध उपलब्ध होते. मात्र विक्री केली जात नाही. गावात श्रीकृष्णाचेपुरातन मंदिर आहे. दरवर्षी गोकुळअष्टमी निमित्त धार्मिक कार्यक्रम होतात.
या गावात ६०० पेक्षा अधिक गाई म्हशी आहेत
अनोखी परंपरा जपणाऱ्या या गावची लोकसंख्या ३००० असून या गावात २२५ कुटुंबे राहतात त्या मधील ९० टक्के कुटुंब हें नंदगवळी समाजातील आहेत या समाजातील प्रत्येक जनाकडे एक गाय आहे या गावात किमान ३०० हून अधिक गायी व २०० पेक्षा अधिक म्हशी आहेत गावात दररोज ६०० लिटर पेक्षा अधिक दूध निघते मात्र त्या दुधाची विक्री केली जात नाही गावात गुनाल दूध लागले तर मोफत दिले जाते हि परंपरा गेल्या कित्येक वर्षा पासून गावात चालू आहे गावातील ग्रामस्थ सांगतात की श्रीकृष्ण पाहिले गवळीना मथुरेला दूध घेऊन जाऊ देत नव्हते सर्व दूध गावातील लहान मुलांना दिले जात होते तिच परंपरा आज या गावात पाळली जाते
आज पालखी मिरवणूक
पुरातन श्रीकृष्ण मंदिरातून शुक्रवारी (१९ आॅगस्ट) सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत पालखी मिरवणूक काढली जाणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल.
लोकवर्गीतून बांधणार मंदिर
येहळेगावातली श्रीकृष्ण मंदिर मदिराचाजिर्नोद्धार करण्याचं निर्णय गावकर्यानी घेतला आहे. आत्ता गावकऱ्याच्या वतीने वर्गणी जमा केली जात आहे
गोपाळकाला म्हणजे आध्यात्मिकता, सामाजिकता, एकता आणि व्यवस्थापन कौशल्य दाखवणारा सण. मथुरेत कंसाच्या बंदीशाळेत श्रावण वद्य अष्टमीला रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णाचा जन्म झाला म्हणून याच दिवशी कृष्णजन्माष्टमी साजरी केली जाते. श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साह आणि मांगल्याचे प्रतीक आहे.
श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्रात भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला असे मानले जाते. पौर्णिमान्त महिना असलेले पंचांग वापरात असल्याने या दिवशी तेथे भाद्रपद कृष्ण अष्टमी येते. दरवर्षी या तिथीबाबत संभ्रम निर्माण होऊन जन्माष्टमी दोन दिवस साजरी केली जाते. श्रीकृष्णाची विविध रूपे प्रेरणादायी आहेत. पहिल्या दिवशी श्रीकृष्ण जयंती साजरी केली जाते आणि दुसऱ्या दिवशी दहीहंडी फोडून गोकुळाष्टमी साजरी करतात.