मुंबई – कॉंग्रेस पक्षाची जनेतेच्या आणि देशाच्या प्रश्नावर लढाई लढण्याची भुमिका आहे. आम्हाला कोणाच्याही व्यक्तिगत जीवनात रस नाही. समीर वानखेडे प्रकरणात देखील आमची भूमिका ठाम होती. मात्र एनसीबीने आर्यन खान हाच फोकस ठेवला.
केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर या प्रकारे हिंदू-मुस्लिम वाद करुन महाराष्ट्राला आणि मुंबईला बदनाम करण्याच काम भाजप सरकार करत आहे. सुशांत सिंह प्रकरणात देखील बिहारच्या निवडणुकीसाठी भाजपाने राजकारण केले, असा आरोप कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
नाना पटोले म्हणाले, शाहरुख खानकडून खंडणी प्रकरणात भाजपाचेच लोक होते. क्रुझ पार्टीनंतर जे फोटो समोर आली त्यावरुन ते स्पष्ट होते. हे लोक भाजपाचे नाहीत असे ते म्हणूच शकत नाहीत. असे प्रश्न निर्माण करुन भाजपा लोकांचे देशातील मुळ प्रश्नावरुन लक्ष हटवत आहे. मात्र कॉंग्रेस मुळ प्रश्न घेऊन लढत आहे, अशी भूमिका पटोले यांनी मांडली.