Nana Patole Accident| महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा भंडारा जिल्ह्यात अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की यात त्यांच्या गाडीचा चक्काचूर झाला. परंतु सुदैवाने यातून नाना पटोले थोडक्यात बचावले आहेत. विदर्भातील भंडारा जिल्ह्यात प्रचार दौऱ्यावर असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या ताफ्यामधील एका वाहनाला ट्रकने धडक दिली. या अपघातानंतर नाना पटोले यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले नाना पटोले?
“भंडाराजवळ आमच्या गाडीला एका ट्रकने जाणीवपूर्वक धडक देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गाडी एका बाजूने घासत पुढे गेली. या अपघातामध्ये मला काहीही झालेलं नाही. परंतु गाडीचं मोठं नुकसान झालं आहे. जनतेच्या आशिर्वादामुळे मी व्यवस्थित आहे. काळजी करण्याचं कारण नाही, या अपघाताबाबत पोलिसांत तक्रार दिलेली आहे,” असे नाना पटोले यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले, “हा अपघात आहे की घातपात, याचा तपास पोलीस करत आहे. पोलीसांच्या तपासानंतर सत्य काय आहे ते बाहेर येईल,” असेही नाना पटोले म्हणाले. अपघातासंदर्भात नाना पटोले यांनी घातपाताची शक्यता व्यक्त केली आहे.
अतुल लोंढे यांचा भाजपवर गंभीर आरोप
नाना पटोले यांच्या अपघातानंतर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी देखील भाजपवर गंभीर आरोप करत उपस्थित केला आहे. नाना पटोलेंच्या गाडीला झालेला अपघात ही अत्यंत गंभीर घटना असून त्यांचा घातपात करण्याचा डाव होता का? अशी शंकाही अतुल लोंढेंनी व्यक्त केली आहे. “विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का ? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भंडारा जिल्ह्याच्या प्रचार दौ-यावर असताना मंगळवारी रात्री कारदा गावाजवळ त्यांच्या गाडीला धडक देऊन चिरडण्याचा प्रयत्न एका ट्रकने केला आहे. ही अत्यंत गंभीर घटना असून त्यांचा घातपात करण्याचा डाव होता का ? अशी शंका आहे. मायबाप जनतेच्या आशिर्वादाने नाना पटोले साहेबांना कोणतीही इजा झाली नसून ते सुखरूप आहेत,” असे ट्वीट अतुल लोंढे यांनी केले.
हेही वाचा: