छोट्या पडद्यावरील “ये रिश्ता क्या कहलाता है’ या हिंदी मालिकेतून अभिनेत्री हिना खानने पदार्पण केले होते. या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. त्याबरोबरच या शोचा सुपरवायझिंग प्रोड्युसर रॉकी जयस्वाल याच्याशी मैत्री झाली आणि नंतर ते एकमेकांच्या खूप जवळ आले.
View this post on Instagram
या दोघांनीही आपले नाते सगळ्यांपासून अनेक दिवस लपवून ठेवले होते. दोघांनी 8 वर्षे एकत्र काम केले. पण त्यावेळी दोघांनीही एकमेकांना केवळ मित्र म्हटले होते. पण, मग “खतरों के खिलाडी’ सीझन 8मध्ये अचानक रॉकी हिनाला साथ देण्यासाठी आला.
View this post on Instagram
खरं तर हिनाने एक पोस्ट लिहिली होती. याच पोस्टमुळे रॉकीदेखील सेटवर आला होता. ज्यानंतर चाहत्यांना त्यांच्या नात्याबाबत उलगडा झाला. त्याचवेळी हिना बिग बॉसमध्ये गेली तेव्हा रॉकी तिला भेटायला आला आणि तिला नॅशनल टीव्हीवर प्रपोजही केले.
View this post on Instagram
View this post on Instagram
रॉकी म्हणाला होता, ‘तुला माहिती आहे, आपण एकत्र खूप वेळ घालवला आहे. तुझ्याशिवाय मी पाहिलेले दिवस यापेक्षा वाईट काहीच असू शकत नाही. बिग बॉस संपताच तुझा सगळा वेळ माझ्या आयुष्यासाठी दे, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो.’ यावर हिनाने देखील होकार दिला होता.
View this post on Instagram
दोघांनीही आपल्या कुटुंबाची एकमेकांशी ओळख करून दिली आणि त्यांच्या कुटुंबाला दोघांच्या या नात्यात काही अडचण नव्हती. दोघेही एकमेकांच्या कुटुंबासमवेत वेळ घालवत असतात. आता दोघे विवाहबंधनात कधी अडकतात याकडे चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.