Himachal Pradesh Congress। हिमाचलमधील सरकारवरील संकट अजून तरी संपलेले दिसत नाही. गंभीर संकटाच्या दरम्यान, काँग्रेस निरीक्षक डीके शिवकुमार, भूपेश बघेल आणि भूपेंद्र सिंह हुडा यांनी गुरुवारी संध्याकाळी घोषणा केली की मतभेद दूर झाले असल्याचे म्हंटले होते. एवढंच नाही तर हिमाचल काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतिभा सिंह यांनीही राज्यसभा निवडणुकीतील पराभवाबद्दल दु:ख व्यक्त केले. आता आम्ही लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू करणार असल्याचे सांगितले. मात्र नेत्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया आणि राज्यातील परिस्थिती यावरून राज्य सरकारवर संकटाचे सावट असल्याचे दिसतंय.
माजी सीएम वीरभद्र सिंह यांचे मुलगा विक्रमादित्य सिंग यांनी आपल्या राजीनाम्यावर अजूनही सस्पेन्स कायम ठेवला आहे. त्या अगोदर “माझ्यावर प्रभू रामाचा आशीर्वाद आहे, काही अडचण नाही, असे विधान विक्रमादित्य यांनी केले होते. मात्र संध्याकाळी सर्वकाही ठीक असल्याचे घोषित केल्यानंतर, सुखू मंत्रिमंडळाची बैठक झाली. या मंत्रिमंडळ बैठकीतून परिस्थिती हाताळण्यासाठी केलेल्या प्रयत्नांनंतर निरीक्षकांनी ज्या प्रकारचे दावे केले आहेत, पण ही सर्व पक्षाकडून सर्वकाही आलबेल असल्याचा संदेश देण्याची चाल होती असे म्हटले जातंय.
विक्रमादित्यांनीराजीनामा मागे घेण्यास नकार दिला Himachal Pradesh Congress।
कारण सभेच्या मध्येच विक्रमादित्य निघून गेले.त्यावरून त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विक्रमादित्य यांनी राजीनामा मागे घेण्यास नकार दिला आहे. मात्र, ते स्वीकारण्यासाठी आपण आपल्यावर कोणताही दबाव टाकणार नसल्याचे त्यांनी निश्चितपणे सांगितले आहे. सखू सरकारचे सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमादित्य बैठक संपल्यानंतर अचानक चंदीगडला रवाना झाले .
विधानसभा अध्यक्षांनी सभागृहाच्या सदस्यत्वासाठी अपात्र ठरवलेल्या बंडखोर आमदारांचीही त्यांनी भेट घेतल्याची चर्चा आहे. बंडखोर आमदारांसोबत झालेल्या बैठकीत विक्रमादित्य काय बोलले याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण सखू आणि प्रतिभासिंग गटात समेट घडवून आणण्याच्या प्रयत्नात बंडखोरांचे सदस्यत्व बहाल करण्याचाही फॉर्म्युला असल्याची चर्चा आहे.