नवी दिल्ली – कर्नाटक राज्यात हिजाबवरुन राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. महाविद्यालयात तरुणींना हिजाब परिधान करण्यास मनाई करण्यात आली आहे. यावरून वाद इतका पेटला की, हे प्रकरण आता थेट न्यायालयात पोहोचलं आहे. यावर राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कर्नाटकमध्ये एका मुस्लीम युवतीसमोर धार्मिक घोषणा देण्याचं लाजिरवान कृत्य भगवा गमछा गळ्यात परिधान केलेल्या युवकांच्या टोळक्याने केलं होतं. त्याला प्रत्युत्तर देत युवतीने देखील “अल्लाहू अकबर”च्या घोषणा दिल्या. या घटनेमुळं देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
यावर लालूप्रसाद यादव म्हणाले की, देश गृहयुद्धाकडे वाटचाल करत आहे. लालू यांच्यापूर्वी प्रियंका गांधी, असदुद्दीन ओवेसी यांच्यासह अनेक नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
प्रियंका गांधींनी ट्विटरवर लिहिले की, ‘बिकिनी असो, जीन्स असो, हिजाब असो किंवा डोक्यावर पदर घेणे असो, महिलांना त्यांच्या इच्छेनुसार कपडे घालण्याचा अधिकार आहे. हा अधिकार त्यांना संविधानाने दिला आहे. त्यांच्यावरील अत्याचार थांबवा.