नवी दिल्ली – हैदराबाद येथे रामानुजाचार्य यांचा पुतळा स्टॅच्यु ऑफ इक्वॅलिटी या नावाने बसवण्यात आला असून त्याचे अनावरण नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे. तथापि हा पुतळाही भारताने चीनकडून तयार करून घेतला आहे.
याचा संदर्भ देत राहुल गांधी यांनी मोदींचा न्यु इंडिया चीन निर्भर इंडिया असल्याची टीका केली आहे. भारतात मोदी सरकारने सातत्याने आत्मनिर्भर भारत असा घोष चालवला आहे. पण भारतातील महत्वाच्या सर्व बाबी मात्र चीनकडूनच तयार करून घेतल्या जात असल्याच्या अनुषंगाने राहुल गांधी यांनी ही टीका केली आहे.
चीनच्या एरोसोन कार्पोरेशन कंपनीला सन 2015 साली हा पुतळा तयार करण्याचे कंत्राट देण्यात आले होते. त्यासाठी 135 कोटी रूपये देण्यात आले आहेत. हा 216 फूट उंचीचा पुतळा आहे. आत्मनिर्भर भारताच्या नावाने चिनी वस्तुंचेच भारतात आक्रमण सुरू असल्याची बाबही राहुल गांधी यांनी या निमीत्ताने निदर्शनाला आणून दिली आहे.