चांद्रयान -2 ने देशवासियांना दिला संदेश
नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने ऐतिहासिक कामगिरी करत चांद्रयान-2 ला अंतराळात पाठवले. याच चांद्रयानाचा प्रवास अत्यंत व्यवस्थित होत असून आतापर्यंत चांद्रयानाने चंद्राच्या दिशेने मार्गक्रमण करत पुढे कूच केली आहे. येत्या 7 सप्टेंबर रोजी चांद्रयान-2 दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. मात्र तत्पुर्वी चांद्रयान-2 कडून देशवासीयांना एक संदेश देण्यात आला आहे. इस्रोने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतची माहिती दिली आहे.
Hello! This is Chandrayaan 2 with a special update. I wanted to let everyone back home know that it has been an amazing journey for me so far and I am on course to land on the lunar south polar region on 7th September. To know where I am and what I’m doing, stay tuned! pic.twitter.com/qjtKoiSeon
— ISRO (@isro) August 17, 2019
‘नमस्कार, मी चांद्रयान-2. माझा आतापर्यंतचा प्रवास विलक्षण झाला. 7 सप्टेंबर रोजी मी दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. मी कुठे आहे आणि काय करत आहे हे जाणून घेण्यासाठी माझ्या संपर्कात राहा’ असे ट्वीट इस्रोने केले आहे. चांद्रयान-2 ने याआधी भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी रात्री 2 वाजून 21 मिनिटांनी यानाने यशस्वीपणे पृथ्वीची कक्षा सोडली आणि चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. जवळपास 4.1 लाख किलोमीटरचा प्रवास करून ते 20 ऑगस्टला अंतिम कक्षेत पोहोचेल.