डोर्लेवाडी – बारामती शहर आणि ग्रामीण भागात गुरुवारी अचानक वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस बरसला. गेल्या काही दिवसापासून या परिसरात उन्हाची तीव्रता प्रचंड वाढलेली होती त्यामुळे उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना उकड्यापासून चांगलाच दिलासा मिळाला आहे.
मात्र अचानक आलेल्या वादळी वारा आणि पावसामुळे काढणीला आलेल्या बाजरी आणि मका पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जोराच्या वादळी वाऱ्यामुळे बाजरी, मका पिकासह तरकरी पिके जमीन दोस्त झाली आहेत. या अगोदर झालेल्या पिकांची नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नसताना आता पुन्हा या अवकाळी आलेल्या पावसामुळे शेतकरी पुरता हतबल झाला आहे.