उन्हाळ्यात वारंवार घाम येतो, तहान लागते. अशा वेळी अनेक जण कोल्डड्रिंग, आईस्क्रीम, थंड पाणी याकडे वळतात. मात्र, काही शीतपेय ही शरीरासाठी हानिकारक असतात. अशावेळी आपण आरोग्यास फायदेशीर पेय घेतले पाहिजे.
ताक :
उन्हाळ्यात ताक पिणे केव्हाही उत्तम. ताक हे नेहमी ताजे प्यावे. ज्यांना पित्ताचा वारंवार त्रास संभवतो, अशा व्यक्तींनी धने, जिरे पावडर टाकून ताक प्यावे. ताक हे भूक वाढवणारे आणि अन्न पचवणारे आहे. रात्रीच्या जेवणात ताक पिणे टाळावे.
लिंबू सरबत :
लिंबू सरबतामुळे उन्हाळ्यात शरीराला आवश्यक असलेले घटक मिळतात. त्याचबरोबर तहान ही भागते.
सोलकढी :
सोलकढी ही शरीरासाठी उपयुक्त असते. सोलकढी आमसूल आणि नारळाचे दुध यांच्या पासून तयार केली जाते.
गुलकंद :
गुलकंद पाण्याब
रोबर प्यायल्याने जळजळ व गर्मी शांत होते.
कोकम सरबत :
कोकम सरबत हे कोकमच्या फळांपासून तयार केलेले असते. मॅग्नेशियम, पोटॅशियम, अशी खनिजही असतात. भूक मंद होणे, अपचन तक्रारी दूर होतात. पचन चांगले होते.
नारळ पाणी :
अत्यंत उपयुक्त आणि आरोग्यवर्धक आहे. हे पाणी प्यायल्याने शररीतील पाण्याचे योग्य संतुलन राखले जाते.
कैरी पन्हं :
कच्ची कैरीपासून हे पेय तयार केले जाते. डिहायड्रेशनपासून दूर ठेवतं. यामध्ये व्हिटॅमिन, मिनरल आणि पोटॅशियम असते.
डॉ. आदिती पानसंबळ नगर. संपर्क : 738572888