कोरोना व्हायरस मुळे सारं जग घाबरलं आहे. चीन मध्ये पसरलेला हा रोग आता अनेक देशात फोफावत आहे. वुहान शहरातून बाहेर पडत या रोगानं आता सार जग काबीज केलंय. गेल्या काही दिवसांपासून अनेक अफवा पसरवल्या जात आहे. त्या कुठल्याच अफवांवर विश्वास ठेवू नका. कोरोणापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी सतत हात धूत रहा, सॅनिटायझर चा वापर करा, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा अशा सूचना वारंवार दिल्या जात आहे. कोरोना वायरस चा धोका बघून जागतिक महासाथ जाहिर करण्यात आली आहे. ही जागतिक आणीबाणी म्हणजे नेमकं काय आहे आणि ती नेमकी कधी लागू होते पाहूया…
– who ने आधी आरोग्य आणीबाणी जाहीर केली. त्यानंतर ही साथ जागतिक महासाथ म्हणून जाहीर केली आहे. यामुळेच चीन सह अनेक देशांवर निर्बंध आले आहेत.
-एखाद्या रोगाचा प्रसार हा आंतराष्ट्रीय स्तरावर होत असेल … आणि या रोगाचा धोका हा जगभर वाढत असेल यावर आळा घालण्यासाठी ही आणीबाणी जाहीर करावी, असं नियमावली मध्ये सांगितलंय.
-Who चे अधिकारी आणि देश प्रतिनिधी एकत्र येतात यावर विचारविनिमय करतात आणि आणीबाणी जाहीर करायची की नाही यावर चर्चा करतात त्यानंतर महासाथ जाहीर केली जाते. सुरुवातीला ही कोरोनाची साथ चीन पुरती मर्यादित होती मात्र आता ती चीन च्या बाहेर पडलीय.
-ही साथ अनेक देशात पसरल्यामुळे याला padmic असं संबोधण्यात आलं. जागतिक महासाथ घोषित करण्याचे असे काही मुख्य किंवा नेमके निकष नाहीत. मात्र परिस्थितीचा आढावा घेत महामारी जाहीर केली जाते.
-कोरोना विषाणूमुळे चीनमध्ये आतापर्यंत २१३ जणांचा मृत्यू झाला आहे. १० हजार जणांना या विषाणूची लागण झाली आहे. कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन जागतिक महासाथ जाहीरकेली आहे.
– जागतिक महासाथ जाहीर झाल्यानंतर देशांच्या सीमांवर, आंतरराष्ट्रीय विमातळावर उतरल्यानंतर आरोग्य तपासणी केली जाते.
– संघटनेकडून कधीही ज्या देशामध्ये आजाराचे मूळ आहे, तिथे प्रवास बंदीचा सल्ला दिला जात नाही. – जगात १६८८४७ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ६४९२ लोकांनी आपला जीव गमावला आहे. ७६५९८ लोकं ठणठणीत बरे झाले आहे. आणि ८५७५७ लोकांवर उपचार सुरु आहे.