नगर – लॉकडाऊनमुळे लोककलावंतावर उपासमारीची वेळ आली आहे. शहरातील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उपेक्षित असलेल्या लोककलावंत व गरजू कुटुंबीयांसाठी किराणा किटचे वाटप करण्यात आले.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवस स्वाभिमान दिवस म्हणून सामाजिक उपक्रमाने साजरा होत आहे. 10 ते 17 मे दरम्यान स्वाभिमान सप्ताह साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर रेल्वे स्टेशन, माळीवाडा व रामवाडी येथील पोतराज, आराधी, वाघ्या-मुरळी यांच्यासह गरजू कुटुंबीयांना किराणा किटचे वाटप करण्यात आले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सुनिल शिंदे, संदीप गायकवाड, विनोद गायकवाड, हनिफ शेख, विवेक विधाते, हनिफ शेख, रवी भिंगारदिवे, गणेश बोरुडे, सागर साळवे, नितेश कसबे, हितेश ठोकळ, गौतम शिंदे आदी उपस्थित होते.
सुनिल शिंदे म्हणाले की, लॉकडाऊनमध्ये वंचित बहुजन आघाडी सर्वसामान्यांसाठी धावून आली असून, त्यांना जीवनावश्यक वस्तू पुरविण्यात येत आहे. लॉकडाऊनमुळे सर्वच स्तरातीक अर्थव्यवस्था बिघडली आहे. आर्थिक संकटामुळे लोककलावंत व आर्थिक दुर्बल घटकांपुढे जीवन जगण्याचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. त्यांना किराणा वाटप करुन या संकटकाळात आधार देण्यात येत आहे. तर स्वाभिमान सप्ताहात अनेक गरजूंना मदत दिली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.