नवी दिल्ली : आयबीआयकडून सर्वसामान्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. रेपो रेटमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय आरबीआयकडून घेण्यात आला आहे. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी याविषयी माहिती दिली आहे.
आधीचाच रेपो रेट कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे तुमच्या कर्जाचा हप्ता आहे तेवढाच राहणार आहे. महागाई आटोक्यात येत असल्याने आरबीआयच्या रेपो रेटमध्ये बदल न करण्याचा निर्णय घेतला असल्याची घोषणा शक्तिकांत दास यांनी केली. सध्या आरबीआयचा रेपो रेट 6.50 टक्के आहे. महागाईच्या पार्श्वभूमीवर देशाच्या मध्यवर्ती बँकेसमोर अजूनही अनेक आव्हाने आहेत.
RBI keeps the repo rate unchanged at 6.5% with readiness to act should the situation so warrant, announces RBI Governor Shaktikanta Das pic.twitter.com/8UoBu5P6tx
— ANI (@ANI) April 6, 2023
आमचे काम अजून संपलेले नाही. जोपर्यंत महागाई दर आरबीआयने ठरवून दिलेल्या लक्ष्याच्या जवळपास किंवा त्याखाली येत नाही तोपर्यंत आम्हाला अथक प्रयत्न करावे लागतील. रेपो रेटमध्ये शेवटची वाढ 8 फेब्रुवारी 2023 ला करण्यात आली होती.
केंद्रीय बँकेने पतधोरण समितीची आठ वेळा बैठक घेतली, या बैठकीपैकी सहा बैठकींमध्ये रेपो दरात वाढ केली आहे. गेल्या वर्षी मे महिन्यापासून ही प्रक्रिया सुरू झाली. तेव्हा आरबीआयचा रेपो रेट चार टक्के होता आणि आता रिझर्व्ह बँकेचा रेपो दर साडे सहा टक्क्यांवर (6.5 %) पोहोचला आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत यांनी ‘जागतिक स्तरावरील वाढत्या संकटाला लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे’ असे म्हटले आहे.