नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आज अर्थसंकल्प सादर करीत आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे. तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन याही अर्थमंत्री म्हणून दुसऱ्यांदा अर्थसंकल्प सादर केला आहे. इंदिरा गांधी यांच्यानंतर केंद्रीय अर्थमंत्रीपदापर्यंत पोहचलेल्या त्या दुसऱ्या महिला आहेत. 2020-2021 साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प त्यांनी सकाळी 11 वाजता अर्थसंकल्पाचं वाचन सुरु झाले आहे.
यावेळी निर्मला सीतारामन म्हणाल्या,’गेल्या 2 वर्षांत 60 लाख नवीन टॅक्स पेयर्स तयार झाले, देशातील इन्स्पेक्टर राज संपवण्यात यश, बँकिंग व्यवस्थेत मोठी सुधारणा झाली तसेच देशातल्या बँकांची स्थिती सुधारली. आता भारत जगातली सर्वांत मोठी 5 व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. परकीय गुंतवणूक वाढली आहे. महागाईवर नियंत्रण मिळवण्यास सरकार यशस्वी झाले आहे असं अर्थ मंत्री म्हणाल्या.