मुंबई : नागरिकत्व कायदा आणि एनआरसी विरोधात मुंबईच्या नागपाड्यात सुरु असलेले आंदोलन मागे घेण्याची घोषणा करण्यात आली आहे.
गेल्या ६ दिवसांपासून नागपाड्यात नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसी विरोधात निदर्शने सुरु होती. या आंदोलनात मुस्लिम महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता.
दरम्यान सुधारीत नागरिकत्व कायद्याविरोधात गेले दीड महिन्याहून अधिक काळ शांततेत सुरु असणाऱ्या आंदोलनाच्या शाहीनबागेतील ठिकाणी शनिवारी दुपारी गोळीबार करण्यात आला. जामीया मिलिया इस्लामिया विद्यापीठाबाहेर झालेल्या गोळीबारापाठोपाठ ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. या परिसरात त्यामुळे तणाव निर्माण झला असून या हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
का कायद्या विरोधात शेकडो महिला आणि पुरूष येथे निदर्शने करत आहेत. त्यांना गोळी मारा, असे प्रक्षोभक वक्तव्य एका केंद्रीय मंत्र्याने केल्याने त्यांना प्रचारास तीन दिवसांची बंदी घालण्यात आली होती. त्यापाठोपाठ जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाबाहेर झालेल्या आंदोलनासमोर जाऊन एका तरूणाने गोळी झाडली होती. त्यात एक तरूण जखमी झाला होता.