मुंबई – राज्यात अद्यापही म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. शेतकरी वर्ग देखील पावसाची वाट पाहत आहे. मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यात दुष्काळ जाहिर करुन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी सरकारकडे केली आहे. याबाबत त्यांनी केलेले ट्वीट सध्या चर्चेत आले आहे.
सुप्रिया सुळेंनी राज्यातील पावासाच्या स्थितीबाबत ट्वीट करत लिहिले की, “महाराष्ट्रात जुन, जुलै या महिन्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यातच या ऑगस्ट महिन्यात देखील सरासरीपेक्षा सुमारे ६८ टक्क्यांनी पाऊस कमी आहे. दि. १ ते १८ ऑगस्ट दरम्यान सर्वच विभागांत पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा ८० टक्क्यांनी कमी आहे. बहुतेक ठिकाणी पाऊस पडलेला नाही. हि परिस्थिती भीषण असून शेतकऱ्यांचे हातचे पीक निघून गेले आहे.हे पाहता या शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रात जुन, जुलै या महिन्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यातच या ऑगस्ट महिन्यात देखील सरासरीपेक्षा सुमारे ६८ टक्क्यांनी पाऊस कमी आहे. दि. १ ते १८ ऑगस्ट दरम्यान सर्वच विभागांत पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा ८० टक्क्यांनी कमी आहे. बहुतेक ठिकाणी पाऊस पडलेला नाही. हि परिस्थिती…
— Supriya Sule (@supriya_sule) August 24, 2023
पुढे त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले की, यासोबतच महाराष्ट्र शासनाने राज्यात दुष्काळ जाहिर करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. परीस्थितीचा तातडीने आढावा घ्यावा. तसेच पिण्याच्या पाण्याचे टॅंकर, जनावरांसाठी चारा छावण्या आणि इतर दुष्काळी कामे हाती घेण्यासंदर्भात तातडीने सकारात्मक विचार करुन अंमलबजावणी करावी.” दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी केलेल्या या मागणीनंतर सरकार काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.