पुणे – एप्रिल अखेरपर्यंत जिल्ह्यात ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती. मात्र, मागील 20 दिवसांत त्यात तब्बल 40 टक्क्यांनी घट झाली आहे. दरम्यान, विभागातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत मात्र प्राणवायूच्या मागणीत वाढ होत आहे.
फेब्रुवारीअखेरपासून पुणे विभागात करोना संसर्ग झपाट्याने वाढू लागला. मार्च आणि एप्रिलमध्ये तर पुणे शहर आणि जिल्ह्यात ऑक्सिजनच्या मागणी वाढल्यामुळे तुटवडा भासू लागला.
काहींना ऑक्सिजनअभावी जीव गमवावा लागला. हीच स्थिती अन्य जिल्ह्यांतही आहे. मागील पंधरा ते वीस दिवसांपासून पुणे शहरातील बाधित संख्येत लक्षणीय घट झाली. त्यामुळे ऑक्सिजनची मागणी कमी झाली आहे.