बेंगळुरू – न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या महिला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील सामने पाहिल्यावर जाणवते की महिला क्रिकेटपटूंकडेही अफाट गुणवत्ता आहे. मात्र, याबाबत माध्यमांचे तसेच चाहत्यांचेही खूप दुर्लक्ष होत आहे. यात बदल झाला पाहिजे व महिला क्रिकेटकडे तसेच त्यांच्या प्रगतीकडेही गांभीर्याने पाहिले गेले पाहीजे, असे परखड मत भारतीय संघाचा स्टार ऑफ स्पीन गोलंदाज रवीचंद्रन अश्विनने व्यक्त केले आहे.
गेल्या पाच ते सात वर्षांपासून महिला क्रिकेट खूपच बदलले आहे. भारतीय संघासह जगभरातील जवळपास प्रत्येक संघात असे काही खेळाडू आले आहेत की ज्यांनी आपल्या कामगिरीने पुरुष क्रिकेटपटूंनाही मागे टाकले आहे.
आता भारतीय संघ देखील प्रगती करत असून यंदा स्पर्धेचे विजेते मानले जात असलेल्या संभाव्य विजेत्यांमध्ये भारतीय संघाचेही नाव घेतले जात आहे, याचे समाधान वाटते, असेही अश्विन म्हणाला.