मुंबई: गेली अनेक दिवस सुरु असलेल्या सत्तानाट्याला अखेर आज पूर्णविराम मिळणार असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यासह मित्र पक्षांच्या 166 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना देऊन महाआघाडीने सरकार स्थापनेसाठी मंगळवारी दावा केला. त्यानंतर उद्धव ठाकरे आज शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.
दरम्यान, हा सर्व घटनाक्रम सुरु राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना घटनेतील तरतुदीची जाणीव करून दिली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असते तरी ते विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य नाहीत.
त्यामुळे घटनेतील तरतुदीनुसार त्यांना पुढच्या सहा महिन्यांत विधिमंडळाचे सदस्य व्हावं लागेल असं राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी दिलेल्या आमंत्रणाच्या पत्रात नमूद केलं आहे.