वृत्तसंस्था – मी भारतामध्ये पाऊल ठेवल्यानंतरच करोनाचा कहर थांबले आणि करोना पूर्णपणे नष्ट होईल, असा दावा स्वयंघोषित संत नित्यानंद याने केला आहे. नित्यानंदने केलेल्या या दाव्याचा व्हिडीओ समोर आले आहे.
देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. गेल्या काही दिवसांपासून ही लाट ओसरत जात आहे. मात्र या लाटेत मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहे. असे असताना नित्यानंदने अजब दावा केला आहे.
नित्यानंदचा गेल्या काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये नित्यानंदचा एक भक्त त्याला भारतामधून करोना कधी नष्ट होणार असा प्रश्न विचारतो. त्यावर उत्तर देताना नित्यानंदने, देवीने माझ्या अध्यात्मिक शरीरामध्ये प्रवेश केल्याचं सांगितले. मी जेव्हा भारतामध्ये पाऊल ठेवेन त्याचवेळी करोना भारतामधून नष्ट होईल, असेही पुढे नित्यानंद म्हणाला आहे.
स्वत:ला ईश्वराचा अवतार मानणारा नित्यानंद हा मूळचा तामिळनाडूचा आहे. त्याचे खरं नाव राजशेखरन असं आहे. २००० साली त्याने बंगळूरु शहराजवळ स्वत:चे आश्रम सुरु केले. तेव्हापासूनच तो चर्चेत आला.
२०१० साली त्याच्यावर दोन मुलींचे अपहरण करुन त्यांच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी गुजरातमधील अहमदाबाद पोलिसांकडे गुन्हा नोंदवण्यात आला होता. बलात्कार प्रकरणात पौरुषत्वाची चाचणीचे प्रकरणही चांगलेच गाजले होते. नित्यानंदने भारतामधून पलायन केले आहे.