नवी दिल्ली : संपूर्ण देशात करोनाने थैमान घातले आहे. दरम्यान,करोनाच्या लढ्यासाठी देशात २१ दिवसांचा लॉक डाऊन पाळण्यात येत आहे. याच लॉक डाऊन आज ९ वा दिवस आहे. त्याच पार्शवभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील जनतेला संबोधित केले. यावेळी देशव्यापी लॉकडाउनला आज ९ दिवस होत आहेत. आजपर्यंत ज्या प्रकारे लोकांनी सहकार्य केले ते अभूतपूर्वी आहे. प्रशासन आणि जनतेनं त्याला उत्तमरित्या सांभाळण्याचे काम केले आहे. २२ मार्च रोजी सर्वांनी करोनाविरुद्ध लढणाऱ्यांचे आभार मानले त्याची दखल सर्व देशांनी घेतली आहे. या लोकांनी संकट काळात सामूहिक शक्तीचे दर्शन घडवले आहे. देश एक होऊन करोनाविरुद्ध लढू शकतो हे आपण दाखवून दिले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
Prime Minister Narendra Modi: The way you paid gratitude to people fighting against #COVID19,on March 22 has become a model that is being emulated by other countries. Janata curfew&ringing of bells/clanging utensils,made the country aware of its unity amid this challenging time. pic.twitter.com/A8DkY37qnU
— ANI (@ANI) April 3, 2020
देशातील कोट्यवधी लोक आज घरात आहेत ते विचार करत असतील की एवढी मोठी लढाई आपण एकटं लढू. अजून असे किती दिवस असतील. आज लॉकडाउन असलं तरी कोणी एकटं नाही. १३० कोटी लोकांची सामूहिक शक्ती एकत्र आहे. वेळोवेळी या सामूहिक शक्तीच्या भव्यतेचं दर्शन घडवणं आवश्यक आहे. या महामारीमुळे पसरलेल्या अंधकारातून आपल्याला प्रकाशाकडे जायचं आहे. ज्यांच्यावर जास्त संकट आलंय अशा गरीब बांधवांना आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. आपल्याला करोना संकटाला हरवायचं आहे, असं मोदी यावेळी म्हणाले.
#WATCH PM Modi: I request all of you to switch off all the lights of your house on 5th April at 9 PM for 9 minutes, and just light a candle, ‘diya’, or mobile’s flashlight, to mark our fight against #coronavirus pic.twitter.com/wpNiEJurBm
— ANI (@ANI) April 3, 2020
१३० कोटी लोकांच्या महासंकल्पाला वर घेऊन जायचंय. ५ एप्रिल रात्री तुमच्या सर्वांचे नऊ मिनिट हवे आहेत. घरातील सर्व लाईट बंद करून घराच्या दरवाज्यावर उभं राहून ९ मिनिटांसाठी मेणबत्ती, दिवा, टॉर्च किंवा मोबाईलची फ्लॅशलाईट सुरू करा. त्यावेळी घरातील सर्व लाईट बंद करून सर्व घरात दिवा उजळेल तेव्हा आपण एकाच ध्येयानं लढत आहोत हे सिद्ध होईल. त्यावेळी प्रत्येकानं आपल्या मनात संकल्प करा आपण एकटे नाही आहोत, असंही मोदी यावेळी म्हणाले. यावेळी कोणीही एकत्र व्हायचं नाही. सोशल डिस्टन्सिंगच्या लक्ष्मण रेषा तोडायची नाही. करोनाची साखळी तोडण्याचा हा रामबाण उपाय आहे, असंही त्यांनी नमूद केलं.