इटावा – उत्तर प्रदेशमधील इटावा येथे सोमवारी राजधानी एक्स्प्रेसच्या धडकेत चार जणांचा मृत्यू झाला. तर, सहा पेक्षा अधिक जखमी झाले. अवध एक्स्प्रेसला लूप लाइनवर थांबवून राजधानी एक्स्प्रेसला सोडले असताना ही घटना घडली.
घटनेची माहिती मिळताच रेल्वेस्थानकावर गोंधळ निर्माण झाला. रेल्वे प्रशासनाचे अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते.
यावेळी रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार यादरम्यान उकाड्याने हैराण झालेले अनेक प्रवाशी रेल्वेतुन उतरून रेल्वे रूळावर थांबले होते त्यावेळी राजधानी एक्सप्रेस तेथुन गेल्याने ही घटना घडली. मृत चारही जण इटावाच्या बलरई रेल्वे स्थानकावर रेल्वे रूळाशेजीरी उभे होते व ते मुज्जफरपुरहून बांद्रा जाणाऱ्या अवध एक्स्प्रेसचे प्रवासी होते.
अवध एक्स्प्रेस सकाळी 6 वाजता बलरई स्थानकावर पोहचली होती. तर साधारण सात वाजता राजधानी एक्स्प्रेस या ठिकाणी आली होती. त्यावेळी राजधानी एक्स्प्रेस तिथुन गेली असता रुळावर उभे असलेल्या लोकांना तिची धडक अनेक प्रवाशांना बसली यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर सहपेक्षा अधिक जखमी झाले. जखमींना तातडीने सैफई व टुंडला येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे या अधिकाऱ्यांनी या वेळी सांगितले.