नवी दिल्ली -भारताच्या नेमबाजांनी अफलातून कामगिरी करताना आयएसएसएफ कनिष्ठ जागतिक नेमबाजी स्पर्धेत तब्बल 40 पदके पटकावली. स्पर्धेच्या अखेरच्या दिवशीही भारताच्या नेमबाजांनी वर्चस्व राखले. भारताने स्पर्धेत 16 सुवर्ण, 15 रजत तर, 9 ब्रॉंझपदकांना गवसणी घातली.
25 मीटर स्टॅंडर्ड पिस्तूल आणि 50 मीटर पिस्तूल या प्रकारांत भारतीय खेळाडूंनी 12 पदके मिळवली. 25 मीटर स्टॅंडर्ड पिस्तूल प्रकारात पुरुषांमध्ये विजयवीर सिद्धूने सुवर्ण, तर उदयवीर सिद्धूने रजतदकाची कमाई केली. हर्ष गुप्ताने ब्रॉंझपदक मिळवले.
महिला गटात रिदम सांगवानने सुवर्णपदकाला गवसणी घातली. 50 मीटर पिस्तूल प्रकारात पुरुषांमध्ये अर्जुन सिंह चिमाने सुवर्णपदक मिळवले. तर, शौर्य सरिन आणि अजिंक्य चव्हाण यांना अनुक्रमे रजत व ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले.
महिलांच्या गटात शिखा नरवालने सुवर्ण, ऐशा सिंहने रजत तर, नवदीप कौरने ब्रॉंझपदकाची कमाई केली.