पुणे : कॉंग्रेस पक्षाने देश उभारण्याचे काम अनेक वर्ष केलं परंतु गेली आठ वर्ष भाजपाने देश विकण्याचे काम केलं यांची जाणीव सर्व नागरीकांनी विशेषता युवकांनी ठेवली पाहिजे. इतिहासाची मोडतोड करण्याचे काम भाजपचे नेते करत आहेत अशी टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी 75 व्या वर्षानिमित्त पंडित जवाहरलाल नेहरु मार्ग, भवानी पेठ या ठिकाणी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जीवनावर आधारीत चित्रसृष्टी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश यांच्या पुढाकारने उभारण्यात आली आहे. या चित्र सृष्टीचे पटोले यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
राज्याचे माजी गृह राज्यमंत्री रमेश बागवे, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहनदादा जोशी तसेच शहराध्यक्ष अरविंद शिंदे, भोर मतदारसंघाचे आमदार संग्रामदादा थोपटे, पुरंदर मतदारसंघाचे आमदार संजय जगताप, सुरेखा खंडाळे, कॉंग्रेस कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठ्ठल थोरात व सूत्रसंचालन अरुण गायकवाड यांनी केले.